सन २०२१ साली महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमध्ये शिवसंत श्री. कृष्णजी निवृत्ती पाटील, छत्रपती शिवरायांच्या समाधीचे पुजारी, श्री क्षेत्र किल्ले रायगड आणि छत्रपती श्री शिवराय अभियान, केखले, वारणा, कोल्हापुर आणि जय शिवराय शिवसामुग्री केंद्रामार्फत मु.पो. घुणकी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापुर येथील ग्रामस्थांना जिवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य, औषधी इत्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.