आपला आवाज सामाजिक संस्था, ठाणे या संस्थेच्या सहकार्याने सन २०२१ साली महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमध्ये ता. महाड, जिल्हा रायगड येथील नवीन वसाहत, कोंडीवते, कोटेश्वरी तळे, नवेनगर, शिरगाव, काजळपुरा, घरटकर आळी, काकरतळे, महाड बाजारपेठ, गवाळ आळी या महाड तालुक्यामधील विविध पुरग्रस्त गावांमध्ये जवळ जवळ दोन महीने भाजीपाला, चटई, चादर, टॉवेल, साड्या, कपडे, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. तसेच न्यु लाईफ पॉलीक्लीनिक हॉस्पिटलचे डॉ. वारीस अन्सारी यांच्या माध्यमातून महाड तालुका व शहरामधील पुराने बाधित झालेल्या विविध आजारग्रस्त रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा राबवून औषधांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीराजे भाजीपाला व्यापारी मंडळ, ए.पी.एम.सी. मार्केट, नवी मुंबई आणि जांभळी नाका, ठाणे येथील भाजीपाला व्यापारी यांच्या मार्फत वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर ताजा व स्वच्छ भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला. पुरपरिस्थिती निवळल्यानंतर आलेल्या दीपावली सणामध्ये या ग्रामस्थांना दिवाळीचा फराळ व एल.ई.डी बल्बचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले तसेच पुरग्रस्तांसाठी राबविण्यात आलेल्या मद्त उपक्रमामध्ये आर्थिक व वस्तुरूपी मद्त केलेल्या सर्व हितचिंतकांचे सन्मानपत्र देऊन आभार मानण्यात आले